Posts

बालपणीची गोड आठवण आणि जीवनशैलीतील बदल: साखरेचा अनुभव, पोषण आणि आरोग्य

 बालपणीची गोड आठवण आणि जीवनशैलीतील बदल: साखरेचा अनुभव, पोषण आणि आरोग्य  बालपणीची आठवण येते तेव्हा मनात एक निरागस गोडवा भरतो. त्या काळात खेळ, घरच्या गप्पा, सण आणि गोड पदार्थ यांचा संगम असायचा. लोक स्वादुपिंड, इन्सुलिन किंवा रक्तातील साखरेची गणना करत नसत, आणि आम्ही सहज ५० जिलब्या, ४० गुलाबजाम, श्रीखंडावर साखर, बुंदीच्या लाडू, पाकातल्या पुरी  आनंद घेत. कोणी मधुमेह किंवा शुगर याचा विचारही करत नसत. आज मात्र जीवन बदलले आहे. मागील ३० वर्षांत लोकांमध्ये साखरेबद्दल भीती निर्माण झाली आहे. मधुमेह, हृदयविकार, वजनवाढ यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जीवनशैली स्थिर झाली आहे, खेळाची संधी कमी झाली आहे, आणि घरच्या पदार्थांचा वापर कमी झाला आहे. बालपणीची जीवनशैली नैसर्गिक संतुलन दाखवते. लोक सतत खेळत, धावत, घरकाम करत किंवा शाळेतील व्यायामामध्ये सहभागी होत, त्यामुळे शरीर नैसर्गिकरीत्या ऊर्जा वापरत असे. साखरेचे प्रमाण जास्त असले तरी शरीराचे चयापचय प्रक्रियांचे संतुलन टिकत असे. बालपणीचा अनुभव फक्त स्वादाचा नव्हता, तर सांस्कृतिक, सामाजिक आणि मानसिक आनंदाचा भागही होता. सणांच्या वेळी घरात बनवलेले लाडू...

“गुढी पाडवा : नववर्षाचे स्वागत, परंपरा आणि धार्मिक-सांस्कृतिक महत्त्व”

  “गुढी पाडवा : नववर्षाचे स्वागत, परंपरा आणि धार्मिक-सांस्कृतिक महत्त्व”  गुढी पाडवा हा फक्त महाराष्ट्रातील नववर्षाचा सण नाही, तर तो भारतीय संस्कृतीतल्या वर्षारंभाचे एक प्राचीन प्रतीक आहे. गुढी पाडव्याची परंपरा फार जुनी असून, मोहेंजोदरो व हडप्पा संस्कृतीच्या काळापासून प्रत्येक घराच्या उंच ठिकाणी दिवा लावण्याची प्रथा होती. त्या दिव्याभोवती ध्वजा, पताका किंवा गुढ्या लावल्या जात होत्या, ज्यामुळे त्या लांबून दिसतात आणि सार्वजनिक आनंदाचे प्रतीक ठरतात. रामायणात उल्लेख आहे की अयोध्येच्या लोकांनी राम, सीता आणि लक्ष्मण यांचे स्वागत करण्यासाठी गुढ्या तोरणे उभारली होती. यामागचा अर्थ फक्त स्वागत नाही, तर सामाजिक ऐक्य, आनंद, आणि नवीन प्रारंभ यांचा द्योतक होता. गुढी उभारण्यामागे घरात सहज उपलब्ध असलेली बांबूची काठी, तांब्याचा कलश, रंगीत रेशमी वस्त्र, आंब्याची पाने, कडुनिंबाची पाने यांचा समावेश असतो. प्रत्येक घटकाचे स्वतःचे तात्त्विक आणि पर्यावरणीय महत्त्व आहे. आंब्याची मोहर पाडव्यापर्यंत फळधारणा करत असते, पण तरीही काही कारणाने तसाच मोहराचा तुरा आणि पाने गुढीला बांधली जातात. आंब्याची पाने धार...

पैशांच्या हव्यासासाठी कोवळ्या जीवांची कत्तल — अवैध गर्भपाताच्या सावलीत महिलांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ

  पैशांच्या हव्यासासाठी कोवळ्या जीवांची कत्तल — अवैध गर्भपाताच्या सावलीत महिलांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ  महाराष्ट्र  पुरोगामी,प्रगतिशील राज्य म्हणून ओळखले जाते. शिक्षण, उद्योग, सामाजिक चळवळी आणि स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत देशात आघाडीवर असलेले हे राज्य अनेक बाबतीत आदर्श मानले जाते. मात्र या प्रगतीच्या चमकदार आवरणामागे काही काळोख्या वास्तवांचे सावटही तितक्याच ठळकपणे दिसून येते. त्यापैकी एक गंभीर आणि मानवी संवेदनांना हादरवून टाकणारा प्रश्न म्हणजे अवैध गर्भपाताचा वाढता उद्योग. कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकत, पैशांच्या हव्यासापोटी काही प्रशिक्षित डॉक्टर, काही अपात्र वैद्यकीय व्यक्ती, तसेच झोलाछाप वैद्य यांच्या संगनमताने कोवळ्या कळ्यांची अक्षरशः कत्तल सुरू असल्याचे चित्र अनेक ठिकाणी समोर येत आहे. हा प्रश्न केवळ एका भ्रूणाच्या नाशापुरता मर्यादित नाही; तर तो स्त्रियांच्या आरोग्याशी, त्यांच्या सन्मानाशी आणि समाजाच्या नैतिकतेशी थेट निगडित आहे. भारतामध्ये गर्भपातासंदर्भात स्पष्ट कायदे (MTP act ) अस्तित्वात आहेत. वैद्यकीय कारणे, आईच्या आरोग्याला धोका, बलात्काराची घटना किंवा क...

ऑनलाईन उपस्थितीचे गैरसमज आणि नात्यांचे नवे संकेत

 ऑनलाईन उपस्थितीचे गैरसमज आणि नात्यांचे नवे संकेत समोरच्याने कसं वागावं याचे संकेत आपण मनात आधीच आखून ठेवलेले असतात. आपल्याला अपेक्षित असलेली वागणूक, प्रतिसादाची वेळ, शब्दांचा सूर, लक्ष देण्याची पद्धत—या सगळ्यांचं एक अदृश्य गणित आपण तयार केलेलं असतं. पूर्वी हे संकेत प्रत्यक्ष भेटीतून, पत्रव्यवहारातून किंवा दूरध्वनीवरच्या संभाषणातून तयार होत असत. पण आता या संकेतांना डिजिटल जगाने, विशेषतः व्हॉटसअॅपसारख्या तत्काळ संदेशव्यवहाराच्या माध्यमांनी, पूर्णपणे नवा आकार दिला आहे. नात्यांच्या उबदारतेचा, मैत्रीच्या खोलीचा, प्रेमाच्या प्रामाणिकतेचा आणि आदराच्या पातळीचा अंदाज आपण दोन निळ्या टिकांवरून, “ऑनलाईन” या हिरव्या शब्दावरून आणि शेवटचं ‘लास्ट सीन’ पाहून लावू लागलो आहोत. ही केवळ तांत्रिक सुविधा नाही; हा एक नवा सामाजिक संकेतशास्त्र आहे. आज एखाद्याने आपला मेसेज पाहिला आणि उत्तर दिलं नाही, तर आपल्याला त्वरित वाटू लागतं—समोरच्याला आपल्यात रस नाही. तो मुद्दाम दुर्लक्ष करतो आहे. आपण त्याच्या प्राधान्यक्रमात नाही. त्या दोन निळ्या टिकांमुळे आपल्याला समोरच्याच्या मनात डोकावल्याचा भास होतो. जणू त्या टिक...

युद्ध, ऊर्जा आणि जागृती : LNG, PNG, CNG आणि LPG मधला फरक समजण्याची वेळ

  युद्ध, ऊर्जा आणि जागृती : LNG, PNG, CNG आणि LPG मधला फरक समजण्याची वेळ जगातील मोठ्या घडामोडी आपल्याला अनेकदा अशा गोष्टी शिकवतात ज्या आपण रोजच्या आयुष्यात वापरत असतो पण त्यांचा खरा अर्थ, त्यामागचं विज्ञान किंवा त्याची जागतिक पार्श्वभूमी आपल्याला माहीत नसते. अलीकडच्या काळात रशिया-युक्रेन युद्धाने जगभरातील ऊर्जा राजकारण हलवून टाकलं आणि त्याच वेळी सामान्य माणसालाही गॅसच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल नव्याने विचार करायला भाग पाडलं. LNG, PNG, CNG आणि LPG ही चार अक्षरं आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो, वापरत आलो; पण त्यांच्यातला फरक, त्यांचा वापर, त्यांचे जागतिक राजकारण आणि अर्थकारण याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नव्हतं. युद्धामुळे ऊर्जा पुरवठ्याच्या साखळ्या तुटल्या, किंमती वाढल्या आणि सरकारांना पर्याय शोधावे लागले तेव्हा या संज्ञा अचानक चर्चेत आल्या. त्यामुळेच युद्धाने आपल्याला ऊर्जा साक्षरतेचा एक धडा दिला, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. भारतासारख्या देशात गॅसचा वापर हा अनेक पातळ्यांवर होतो. घरातील स्वयंपाकापासून ते वाहनांच्या इंधनापर्यंत आणि उद्योगधंद्यांच्या मोठ्या प्रक्रियांपर्यंत गॅसची भूमिका...

जग ‘गॅस’वर आणणारे युद्ध आणि आपण

 जग ‘गॅस’वर आणणारे युद्ध आणि आपण आजच्या जागतिकीकरणाच्या काळात एखाद्या देशातील युद्ध हे फक्त त्या देशापुरते मर्यादित राहत नाही, तर त्याचे पडसाद हजारो किलोमीटर दूर असलेल्या समाजांवर, अर्थव्यवस्थांवर आणि सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनावर उमटत असतात. गेल्या काही दिवसांत वाचायला मिळालेल्या दोन बातम्यांनी ही गोष्ट पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित केली. पहिली बातमी होती पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीतील गॅसवर चालणारी शवदाहिनी तात्पुरती बंद पडल्याची. कारण अत्यंत साधे पण तितकेच अस्वस्थ करणारे होते—गॅस उपलब्ध नसणे. दुसरी बातमी होती अनेक शहरांतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स उद्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची. त्यामागचे कारणही तेच—कमर्शियल LPG गॅसचा तुटवडा. या दोन घटना वरकरणी स्थानिक वाटू शकतात, परंतु त्या प्रत्यक्षात जागतिक राजकारणाच्या एका मोठ्या उलथापालथीशी जोडलेल्या आहेत. भारतातील स्वयंपाकघरात वापरला जाणारा LPG गॅस हा आजच्या जीवनाचा अत्यावश्यक भाग झाला आहे. ग्रामीण भागापासून ते महानगरांपर्यंत स्वयंपाक, लहान उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि अनेक सार्वजनिक सेवा या सर्वांचा पाया LPG वर उभा आहे. मात्र या...

मृत्यू, माणसं आणि सल्ल्ले

  मृत्यू, माणसं आणि सल्ल्ले माणसाचा जन्म जितका स्वाभाविक आहे तितकाच मृत्यूही स्वाभाविक आहे. जीवनाचा हा अखंड प्रवास जिथे सुरू होतो तिथेच कधीतरी थांबणार हे प्रत्येकाला ठाऊक असतं. पण मृत्यूद जरी निसर्गाचा साधा नियम असला, तरी त्याभोवती माणसांनी उभं केलेलं सामाजिक जग मात्र अनेकदा खूप गुंतागुंतीचं आणि कधी कधी विचित्रही वाटतं. एखाद्या घरात मृत्यूची बातमी आली की त्या घरात दुःखाचा डोंगर कोसळतो. काही क्षणांसाठी सगळं थांबल्यासारखं होतं. घरातल्या लोकांच्या मनात अविश्वास, वेदना, धक्का आणि आठवणींचा महापूर एकाच वेळी उसळत असतो. पण त्या घराच्या बाहेर मात्र एक वेगळीच हालचाल सुरू झालेली असते. जणू काही एका दुःखद प्रसंगाभोवती समाजाचा एक छोटा कार्यक्रमच आकार घेत असतो. मृत्यूची बातमी ही आपल्या समाजात विलक्षण वेगाने पसरते. एखाद्या शेजाऱ्याने किंवा नातेवाईकाने फोनवरून ही बातमी सांगितली की काही मिनिटांतच ती अनेकांच्या कानावर पोहोचते. “काय झालं?”, “कधी झालं?”, “अचानक का?” अशा प्रश्नांचा वर्षाव सुरू होतो. घरातल्या लोकांना अजून धक्का सावरायलाही वेळ मिळालेला नसतो, पण बाहेरच्या जगात बातमी पोहोचवण्याची एक धावपळ स...